ई-पीक पाहणी 2025 सुरू – शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती!

ई-पीक पाहणी 2025 सुरू – शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती!

🙏 नमस्कार शेतकरी बांधवांनो,

राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त असा ई-पीक पाहणी 2025 प्रकल्प खरीप हंगामासाठी सुरू झाला आहे!

मुदत: 1 ऑगस्ट 2025 ते 15 सप्टेंबर 2025

या काळात आपण आपल्या शेताच्या सातबाऱ्यावर असणाऱ्या खरीप हंगामातील पिकांची नोंदणी ई-पीक पाहणी अ‍ॅप किंवा पोर्टलद्वारे करू शकता.

कशी कराल ई-पीक पाहणी?

  • आपल्या मोबाईलमधून ‘ईपीक पाहणी’ अ‍ॅप डाउनलोड करा.

  • किंवा जवळच्या सेतू केंद्र, मित्र, कृषी सहाय्यक यांच्याकडून मदत घ्या.

  • शेवटची मुदत 15 सप्टेंबर 2025 आहे, त्यामुळे वेळेत नोंदणी पूर्ण करा.

  • sarkariyojana.store

  • E PIk Phani aap Link  https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova&hl=en-US

ई-पीक पाहणी 2025 संदर्भातील महत्वाची माहिती

नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या सातबाऱ्यावरती पीक पेरा नोंदवण्यासाठी राबवला जाणारा एक महत्त्वाचा असा प्रकल्प म्हणजे इपीक पाहणी मित्रांनो ईपीक पाहणी 2025 अंतर्गत खरीप हंगामा करता राज्यातील शेतकऱ्यांना आपला पीक पेरा नोंदवण्यासाठी ईपीक पाहणी करण्यासाठी एक ऑगस्ट 2025 पासून 15 सप्टेंबर 2025 पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे.

या मुदतीच्या अंतर्गत आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून ईपीक पाहणी करण्यासाठी प्रयत्न केले जात होते. परंतु 1 ऑगस्ट पासून सुरू होणारे प्लिकेशन काही तांत्रिक कारणास्तव सुरु करण्यात आलेलं नव्हतं याच्यामध्ये शेतकऱ्यांना ईपीक पाहणी करण्यासाठी लॉगिन करता येत नव्हतं.

याच्याच मध्ये आता हे प्लिकेशन अपडेट करण्यात आलेल आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांना आता ईपीक पाहणी 2025 अंतर्गत खरीप हंगामातील आपल्या निर्भेळ पिकासाठी आपल्या कायम पडीसाठी आपल्या जे काही तात्पुरती पड असेल विहीर असतील बोर असतील याची ईपीक पाहणी करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असा प्रकल्प म्हणजे एपी पाहणे कारण शेतकऱ्यांना दिला जाणारा पीक विमा असेल शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचे लाभ असतील शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई असेल किंवा भावांतर योजना असेल अशा सर्व योजनांचे लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांची ईपीक पाहणी होणं अतिशय गरजेचं असतं आणि याच्याच अंतर्गत आता खरीप हंगाम 2025 करता ही ईपीक पाहणी सुरू करण्यात आलेली आहे.

प्लिकेशन नवीन आहे अपडेट झालेल प्लिकेशन आहे याच्यावरती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून ईपीक पाहणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि लोड जास्त असल्यामुळे साहजिकच याच्यामध्ये काही आता तांत्रिक बिगाड सुद्धा वेळोवेळी येणार आहे इथ ईपीक पाहणीची शेवटची मुदत ही 15 सप्टेंबर 2025 आहे.

ईपीक पाहणी जशी जशी हळूहळू सुरळित होईल तशी तशी आपली ईपीक पाहणी करून घेण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो ईपीक पाहणी ही अतिशय महत्त्वाची आहे 15 सप्टेंबर 2025 पर्यंत करून घ्या. याच्यानंतर ज्या काही शेतकऱ्यांची इपीक पाहणी बाकी राहील त्यांची इपीक पाहणी ही जे काही इपीक पाहणी सहाय्यक असतील त्यांच्या माध्यमातून करून घेतली जाणार आहे परंतु ईपीक पाहणी आपली सहायकाच्या माध्यमातून करून घेण्याचा वाट पाहू नका आपल्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा आपल्या जवळच्या मित्रांच्या माध्यमातून इतर काही जे पीक पाहणी करून देत असतील त्यांच्या माध्यमातून आपल्या पिकांची ताबडतोप पीक पाहणी करून घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद

ईपीक पाहणी 2025 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

ईपीक पाहणी 2025 साठी 1 ऑगस्ट 2025 पासून 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वेळ दिली आहे.

ईपीक पाहणी ही शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर घेतलेल्या पिकांची ऑनलाइन नोंदणी करण्याची सरकारी प्रणाली आहे. यामध्ये सातबाऱ्यावर पिकांची माहिती भरली जाते.

पीक विमा, नुकसान भरपाई, अनुदान, भावांतर योजना, व शेतकऱ्यांसाठी असलेल्या इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ईपीक पाहणी अनिवार्य आहे.

  • मोबाईलमधून ‘ईपीक पाहणी’ अ‍ॅप डाउनलोड करा.

  • त्यामध्ये लॉगिन करून सातबाऱ्याची व पीक माहिती भरा.

  • किंवा जवळच्या सेतू केंद्र, मित्र, किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडून करवून घ्या.

जर पीक पाहणी केली नाही, तर शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार नाही – जसे की पीक विमा, नुकसान भरपाई, अनुदान इत्यादी.

1 ऑगस्ट रोजी अ‍ॅपमध्ये तांत्रिक अडचणी होत्या, पण आता अ‍ॅप अपडेट करण्यात आले आहे. तरीही लोड जास्त असल्यास थोडा वेळ थांबून पुन्हा प्रयत्न करा.

15 सप्टेंबर 2025 नंतर ईपीक पाहणी सहाय्यकांच्या माध्यमातून करण्यात येईल. पण स्वतः करून घेणं फायदेशीर ठरेल.

  • शेताचा सातबारा

  • पीकाचे नाव

  • क्षेत्रफळ

  • पाणी स्रोत (विहीर/बोर/कायम पड/तात्पुरता पड)

💬 तुमच्या परिसरातील शेतकरी मित्रांनाही ही माहिती जरूर शेअर करा. आपली पीक पाहणी वेळेत करा आणि शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्या! धन्यवाद! 🙏🌱

फार्मर आयडी असला की शेती योजनांसाठी आता कुठलीही कागदपत्रं नकोत – राज्य शासनाचा मोठा निर्णय!

फार्मर आयडी असला की शेती योजनांसाठी आता कुठलीही कागदपत्रं नकोत – राज्य शासनाचा मोठा निर्णय!

नमस्कार शेतकरी बांधवांनो!

शेतकऱ्यांच्या कामकाजात अधिक सुलभता आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच घेण्यात आलेला आहे. आता शेतकऱ्यांना कोणतीही कृषी योजना अर्ज करताना फार्मर आयडी असल्यास, सातबारा, आठ उतारा किंवा इतर कागदपत्रं पुन्हा-पुन्हा अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

काय आहे निर्णयाचे सार?

राज्य शासनाच्या कृषी विभागाने प्रसिद्धीपत्रक जारी करत सूचित केलं आहे की, फार्मर आयडी असलेला शेतकरी योजनेसाठी पात्र असेल आणि योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अधिक कागदपत्रांची मागणी करणे आवश्यक नाही.

फार्मर आयडी हे एक असे डिजिटल ओळखपत्र आहे जे:

नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी योगाच्या माध्यमातून एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना कोणत्याही कृषी वरणांचा लाभ घेत असताना फक्त फार्मर आयडी असणं गरजेच आहे याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारच्या कागदपत्राची गरज लागणार नाही.

राज्यामध्ये केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना महाडीबीडी फार्मर्स स्कीमच्या पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जातात. मित्रांनो योजनेच्या अंतर्गत प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य दिल जात आहे आणि अशा तत्वावरती या योजनांची अंमलबजावणी केली जात आहे.

योजनाची अंमलबजावणी केली जात असताना ज्या शेतकऱ्यांची निवड या योजनेच्या अंतर्गत केली जाईल त्या शेतकऱ्यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितल जात आणि या कागदपत्रामध्ये प्रत्येक वेळी मागितल जाणारं महत्त्वाचं अस कागदपत्र म्हणजे शेतीचा सातबारा आणि आठ  ही बंधनकारक कागदपत्र याच्यामध्ये ठेवण्यात आलेली आहेत बऱ्याच वेळा याच्यामध्ये सातबारा स्पष्ट असणं किंवा इतर काही त्याच्यामध्ये चुका काढणं आणि अशा चुकास्तव हे कागदपत्र परत एकदा लाभार्थ्यांकडे परत पाठवणं त्या लाभार्थ्याला पूर्वसंमत्या देण्यापासून रोखणं किंवा या सर्व कागदपत्रामुळे लाभार्थ्याला लाभ मिळण्यामध्ये दिरंगाई होणं अशा प्रकारच्या बाबी निदर्शनास आलेल्या आहेत

आणि याच अनुषंगाने कृषी आयुक्तांच्या सूचनेनुसार कृषी संचालकाच्या माध्यमातून एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलेल आहे ज्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून फार्मर आयडी दिलेला आहे अशा फार्मर आयडी धारक शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची कागदपत्र हे कृषी अधिकारी किंवा इतर अधिकाऱ्यांनी मागणी करू नयेत अशा प्रकारच्या सूचना याच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत

एकंदरीत आपण जर पाहिलं तर महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती आता फार्मर आयडी नुसारच योजनेचा अर्ज करता येतो लाभ घेता येतो आणि अशाप्रकारे आता फार्मर आयडीच्या माध्यमातून अर्ज केल्यानंतर लाभ घेत असताना किंवा लाभ घेत असताना फार्मर आयडी दिल्यानंतर पुन्हा कागदपत्राची मागणी करू नये कारण फार्मर आयडी हा इंटिग्रेटेड पोर्टलच्या माध्यमातून बनवला जात आहे

याच्यामध्ये शेतकऱ्याच्या जमिनीची माहिती जोडल्यानंतरच त्या शेतकऱ्याचा फार्मर आयडी जनरेट होतो त्याच्यामुळे फार्मर आयडी असल्यानंतर ही अनावश्यक असलेली कागदपत्र मागू नये अशा प्रकारच्या सूचना या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत आणि अशाच प्रकारच हे प्रसिद्धी पत्रक सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पाठवण्यात आलेल आहे

जेणेकरून आता कुठल्याही प्रकारच्या डेस्टला असलेला अर्ज हा या सातबारा आठ अशा कागदपत्रासाठी परत पाठवला जाणार नाही.

अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाचा असा निर्णय ज्याच्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांचा काही प्रमाणामध्ये खर्च देखील वाचणार आहे.

काय अडचणी होत्या आधी?

पूर्वी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर योजना अर्ज करताना सातबारा, आठ उतारा, बँक पासबुक इत्यादी अनेक कागदपत्रं पुन्हा-पुन्हा अपलोड करावी लागत होती.
या प्रक्रियेमध्ये:

  • कागदपत्रं अपलोड करताना चुका होत,

  • सातबारा अस्पष्ट असल्यामुळे अर्ज रिजेक्ट होत,

  • अर्जाची प्रक्रीया उशिराने होत,

  • काही वेळेस शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास विलंब लागत होता.

  • https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/

  • sarkariyojana.store

🤝 शेवटी काही शब्द…

हा निर्णय खरोखरच शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. फार्मर आयडीच्या माध्यमातून आता योजनांचा लाभ अधिक सहजतेने, पारदर्शकतेने आणि वेळेत मिळू शकतो. हे पाऊल डिजिटल कृषी व्यवस्थेकडे वाटचाल दर्शवते आणि भविष्यातील शेतकऱ्यांसाठी नक्कीच क्रांतिकारी ठरणार आहे.

धन्यवाद 🙏 जय जवान, जय किसान!