खरीप हंगाम 2025 मधील अतिवृष्टी मुळे पिकांचं नुकसान – शेतकऱ्यांनी आत्ताच काय करावं?

खरीप हंगाम 2025 मधील अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान – शेतकऱ्यांनी आत्ताच काय करावं?

खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टी

खरीप हंगाम 2025 मधील अतिवृष्टी मध्ये राज्यभर मान्सूनचा लहरीपणा दिसून येत आहे. एप्रिल–मे–जूनमध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर काही काळ पावसाचा खंड पडला. परंतु आता ऑगस्ट 2025 च्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा एकदा अतिवृष्टी होत असून अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

कोणत्या भागात मोठे नुकसान?

  • खरीप हंगाम 2025 मधील अतिवृष्टी

  • मराठवाडा (काही जिल्हे)

  • अमरावती विभाग

  • विदर्भातील काही जिल्हे

  • सोलापूर जिल्ह्याचा काही भाग

  • पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग

  • अहमदनगरचा काही भाग

या भागात मूग, उडीद, सोयाबीन, तूर आणि कापूस या पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.

कोणत्या पिकांना जास्त फटका?

  • मूग : तोंडणीला आलेल्या मुगाचं सर्वात जास्त नुकसान.

  • उडीद व सोयाबीन : काही प्रमाणात वाचण्याची शक्यता.

  • तूर : पाण्याखाली आल्यानंतर ओमाळण्याचा धोका.

  • कापूस : सततच्या पावसामुळे प्रतिकूल परिणाम.

खरीप हंगाम 2025 मधील अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान – शेतकऱ्यांनी आत्ताच काय करावं?

शेतकऱ्यांनी आत्ताच काय करावं?

  • आपल्या कृषी सहाय्यक व तलाठी यांच्याशी तात्काळ संपर्क साधा.

  • झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून घ्या.

  • शासनाच्या आदेशाची वाट न पाहता स्वतःहून पाठपुरावा करा.

  • जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयाच्या सूचनांनंतर पंचनामे अधिकृतरीत्या सुरू होतील, पण त्याआधीही आपली नोंद करणे महत्वाचे.

  • नमस्कार मित्रांनो खरीप हंगाम 2025 मध्ये सुद्धा मान्सूनचा मोठ्या प्रमाणात लहरीपणा दिसून येतोय आणि याच्याचमुळे शेतकऱ्यांचा आता मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो सुरुवातीला एप्रिल मे जून महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला शेतकऱ्यांच्या माध्यमातून पेरण्या करण्यात आल्या याच्यानंतर काही दिवसाचा पावसाचा खंड पडला आणि पुन्हा एकदा या ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग आपल्याला राज्याच्या विविध भागांमध्ये पाहायला मिळालेली आहे.

    याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर विशेषत मराठवाड्यातील काही जिल्हे असतील अमरावती विभाग असेल विदर्भातील काही जिल्हे असतील किंवा इकडे सोलापूर जिल्ह्याचा काही भाग असेल पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग असेल अहिल्यानगरचा काही भाग असेल या भागामध्ये अतिशय जोरदार पाऊस होतय आणि याच्याचमुळे आपण जर पाहिलं तर खरीपाची पीकं ज्याच्यामध्ये मुख्यतः मूग उडीद आणि सोयाबीन या पिकांच आता नुकसान दिसून यायला सुरुवात झालेली आहे.

    मूग तोंडणीला आलेले आहे तर अशा परिस्थितीमध्ये आता मुगाच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. उडीत सोयाबीन जरी वाचले तरी मूग मात्र शेतकऱ्यांच्या हाती लागू शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मूग असेल, उडीद असेल किंवा सोयाबीन असेल किंवा इतर पिकं आता तुरीची पिकं सुद्धा पाण्याखाली आल्यानंतर ते तूर ओमाळले जाऊ शकते किंवा इतर काही त्याच्यावरती दुष्परिणाम दिसून येऊ शकतात कापसावरती परिणाम होऊ शकतात अशा सर्व परिस्थितीमध्ये जर आपल्याकडे अतिवृष्टी झालेली असेल पूर परिस्थिती निर्माण झालेली असेल किंवा गेल्या पाच दिवसापासून सलगचा सततचा पाऊस असेल अशा कारणामुळे जर आपल्या शेती पिकांच नुकसान दिसून येत असेल तर आपल्या तात्काळ कृषी सहायक तलाठी यांच्याशी संपर्क साधून आपल्या होत असलेल्या आपल्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून घेण्याचा प्रयत्न करा.

    खरीप हंगाम 2025 मध्ये जो पीक विमा दिला जाणार आहे तो पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे दिला जाणार आहे आणि ज्या ज्या महसूल मंडळामध्ये ज्या ज्या गावांमध्ये अशा प्रकारे पावसांना नुकसान होतय त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पंचनामे केले जातात नुकसानाचा आता जी काही आकडेवारी समोर येईल त्याच्यामध्ये जर ती गाव बाधित दिसली तर पुढे पीक कापणीच्या टाईमाला सुद्धा याचा फायदा होऊ शकतो आणि शासनाच्या माध्यमातून जी काही आता समजा अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे जर या पिकांचं नुकसान जर जास्त दिसून आलं आणि जर मदत दिली तर ती मदत सुद्धा या पंचनाम्याची आधारेच मिळू शकते

    त्याच्यामुळे आपलं जर नुकसान झालेल असेल तर शासनाच्या कुठल्याही आदेशाची किंवा शासनाच्या प्रशासनाच्या कुठल्याही आदेशाची वाट न पाहता आपल्या तलाठी आपल्या कृषी सहायकाग्रह या पंचनाम्यासाठी पाठपुरावा करायला सुरुवात करा.

    लवकरच याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आता पाऊस होतय. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान होत त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तहसील कार्यालयाला काही सूचना देतील आणि तहसीलदारांच्या माध्यमातून त्या तालुक्यामधील त्या भागातील जी काही असलेली गाव असतील जे नुकसानग्रस्त मंडळ असतील त्याचे पंचनामे करण्यासाठी तलाठी कार्यालयाला सांगितल जाईल तोपर्यंत आपली जबाबदारी आपण नक्की पार पाडण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपणास नुकसान भरपाई असेल किंवा सरते शेवटी जो काही पिकवीमा असेल तो सुद्धा मिळण्यासाठी मदत होईल धन्यवाद

पंचनाम्याचं महत्त्व

  • पंचनाम्याच्या आधारेच पीक विमा दाव्याची गणना होईल.

  • शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई (Ativrushti Madat / Flood Relief) मिळण्यासाठी हा कागदोपत्री पुरावा ठरणार.

  • खरीप हंगाम 2025 मध्ये पिकविमा पीक कापणी अहवालावर आधारित दिला जाणार असल्याने आत्ताच केलेला पंचनामा फार महत्त्वाचा आहे.

  • sarkari yojana –  https://sarkariyojana.store/

  • pmfby app – https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central&hl=en-US

निष्कर्ष

शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे आपल्या शेताचं नुकसान त्वरित पंचनाम्यात नोंदवा. हेच पुढे नुकसानभरपाई आणि पीकविमा मिळवण्यासाठी मदत करणारं पाऊल ठरेल.

शेतकऱ्यांना दिलासा – अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी नुकसान भरपाई ला शासनाची मंजुरी 2025

शेतकऱ्यांना दिलासा – अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी नुकसान भरपाईला शासनाची मंजुरी!

नमस्कार मित्रांनो,

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा व दिलासादायक निर्णय आज राज्य शासनाकडून घेण्यात आलेला आहे. सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 आणि जून 2025 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी राज्य शासनाने नुकसान भरपाई साठी तीन स्वतंत्र शासन निर्णय (GR) निर्गमित केले आहेत.

जिल्हानिहाय नुकसान भरपाई चा तपशील

🔸 धाराशिव जिल्हा:

  • प्रस्ताव 1:

    • लाभार्थी: 79,880 शेतकरी

    • रक्कम: ₹86 कोटी 46 लाख 34 हजार

  • प्रस्ताव 2:

    • लाभार्थी: 2,48,59 शेतकरी

    • रक्कम: ₹174 कोटी 97 हजार

🔸 छत्रपती संभाजीनगर जिल्हा:

  • लाभार्थी: 7,584 शेतकरी

  • रक्कम: ₹6 कोटी 65 लाख 41 हजार

🔸 धुळे जिल्हा:

  • लाभार्थी: 1 शेतकरी

  • रक्कम: ₹4,000

➕ एकूण छत्रपती संभाजीनगर विभागातील नुकसान भरपाई:

  • लाभार्थी: 33,523

  • रक्कम: ₹268 कोटी 79 हजार

जून 2025 – अतिवृष्टी व पूरग्रस्त विदर्भातील शेतकऱ्यांना मदत अमरावती विभागातील जिल्हानिहाय मदत:
जिल्हाशेतकरी लाभार्थीनुकसान भरपाई रक्कम
अमरावती2,240₹2 कोटी 75.79 लाख
अकोला6,136₹4 कोटी 5.90 लाख
यवतमाळ186₹25.45 लाख
बुलढाणा90,383₹74 कोटी 45 लाख
वाशिम8,527₹5 कोटी 71 लाख
एकूण1,07,472₹86 कोटी 23.38 लाख
फळबागांचे नुकसान झालेल्या छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकऱ्यांसाठी मंजूर रक्कम:
जिल्हाशेतकरीमंजूर रक्कम
छत्रपती संभाजीनगर171₹16.01 लाख
हिंगोली3,247₹1 कोटी 45 हजार
नांदेड7,498₹10 कोटी 76.19 लाख
बीड103₹1.09 लाख
एकूण11,019₹14 कोटी 54.64 लाख

नमस्कार मित्रांनो राज्यातील सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या याचप्रमाणे जून 2025 मध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या परंतु अद्यापही शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच वितरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आजच्या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राज्यातील सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये नुकसानग्रस्त झालेल्या धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि धुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी याचप्रमाणे जून 2025 मध्ये नुकसानग्रस्त झालेल्या विदर्भातील अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी याचप्रमाणे जून 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यांसाठी देखील राज्य शासनाच्या माध्यमातून आज नुकसान भरपाईसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे

आणि याच्या संदर्भा तील तीन महत्त्वाचे असे जीआर आज 6 ऑगस्ट 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत याच्यामधील पहिला जीआर आपण पाहू शकता सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये नुकसानग्रस्त झालेल्या धाराशीव छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यासाठी निधी मंजूर करण्याच्या संदर्भातील याच्या माध्यमातून धाराशीव जिल्ह्यामध्ये दोन प्रस्ताव दाखल करण्यात आलेले होते.

पहिल्या प्रस्तावामधील 79,880 शेतकऱ्यांसाठी 86 कोटी 46,34,000 रुपये तर दुसऱ्या प्रस्तावाच्या माध्यमातून 2,48,59 शेतकऱ्यांसाठी 174 कोटी 97,000 एवढी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. तर सप्टेंबर 2024 मध्ये नुकसानग्रस्त झालेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील 7584 शेतकऱ्यांना 6 कोटी 65 लाख41000 रुपयाची नुकसान भरपाई या जीआरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे आणि एकूण छत्रपती संभाजीनगर विभागातील 33523 शेतकऱ्यांना 268 कोटी आला 79000 रुपयाची नुकसान भरपाई या जीआरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे.

याचप्रमाणे धुळे जिल्ह्यातील एका शेतकऱ्यासाठी 4000 रुपयाची नुकसान भरपाई देखील या जीआरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे. मित्रांनो याचप्रमाणे जून 2025 मध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे विदर्भात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यात विभागातील पाचही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच नुकसान झालेलं होतं. याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात समावेश होता आणि अशा अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यासाठी आज शासन निर्णयाच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे.

याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यामधील 2240 शेतकऱ्यांना 2 कोटी75,79,000 अकोला जिल्ह्यातील 6,136 शेतकऱ्यांसाठी 4 कोटी 5,90,000 रुपये यवतमाळ जिल्ह्यामधील 186 शेतकऱ्यांना 25 लाख45,000 रुपये तर बुलढाणा जिल्ह्यातील 90,383 शेतकऱ्यांना 74 कोटी 45 लाख रुपये वाशिम जिल्ह्यातील 8527 शेतकऱ्यांसाठी च कोटी 71 लाख रुपये याच अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील एक सा 472 शेतकऱ्यांसाठी 86 कोटी 23 लाख 38 हजार रुपयाची नुकसान भरपाई या जीआरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे

याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर विभागातील जून 2025 मध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील 171 शेतकऱ्यांना 16 लाख1 हज रुपयाची तर हिंगोली जिल्ह्यामधील एकूण 3247 शेतकऱ्यांना कोटी साला 45000 रुपयाचे नांदेड जिल्ह्यामधील 7498 शेतकऱ्यांना 10 कोटी 76 लाख 19 हजार रुपयाची तर बीड जिल्ह्यामधील 103 शेतकऱ्यांना एक लाख 9 हज रुपये अशी एकूण छत्रपती संभाजीनगर विभागातील 119 शेतकऱ्यांसाठी 14 कोटी 54 लाख 64 हज रुपयाची नुकसान भरपाई या जीआरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे.

जून 2025 मध्ये झालेलं नुकसान हे मुख्यतः फळबागांच होतं याच्यामध्ये संत्रा असेल मोसंबी असेल किंवा इतर काही फळबागांच नुकसान झालेलं होतं आणि याच्याचसाठी या छत्रपती संभाजीनगर याचप्रमाणे अमरावती विभागातील शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे.

याचबरोबर धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरचा जून ते ऑक्टोबर 2024 च देखील थकीत असलेल अनुदान हे आज या जीआर च्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल आहे. मित्रांनो लवकरच याच्या केवायसी साध्या याद्या प्रकाशित केल्या जातील आणि जे शेतकरी याच्या अंतर्गत केवायसी करतील अशा पात्र असलेल्या शेतकऱ्यांना या अनुदानाच वितरण केल जाणार आहे.

1 ) SARKARIYOJANA.STORE

2 ) SHASHKIY YOJANA GR

निष्कर्ष:

राज्य सरकारने शेतीच्या नुकसानीबाबत गंभीरतेने लक्ष घालून हजारो शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. आता शेतकऱ्यांनी वेळेवर KYC प्रक्रिया पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा.